देशभरात आज श्रीराम नवमीचा पवित्र सण मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरांमध्ये विशेष पूजा, अभिषेक, भजन-कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या पावन दिवशी “जय श्रीराम”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले असून, सर्वत्र भक्तिमय आणि मंगलमय ऊर्जा अनुभवायला मिळत आहे. भाविकांनी प्रभू श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होत त्यांच्या आदर्श जीवनातून प्रेरणा घेण्याचा संकल्प केला.
“सत्य, धर्म, कर्तव्यनिष्ठा आणि आदर्श आचरण” ही प्रभू श्रीरामांची शिकवण आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या जीवनातून समाजात एकात्मता, बंधुभाव आणि शांततेचा संदेश मिळतो. या निमित्ताने विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.अनेक ठिकाणी रामजन्मोत्सवाच्या शुभमुहूर्तावर शंखनाद, आरती आणि पालखी सोहळ्यांनी उत्सवाला विशेष रंगत आली. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या सणात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
याच पार्श्वभूमीवर नागरिकांना रामराज्याच्या संकल्पनेप्रमाणे न्याय, समानता आणि सद्भावना जपण्याचे आवाहन करण्यात आले. समाजात शांतता, बंधुभाव आणि सकारात्मकता निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आपली भूमिका पार पाडावी, असा संदेशही देण्यात आला. प्रभू श्रीरामांच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, अशी प्रार्थना सर्वत्र करण्यात येत आहे.
